कुमदाळ येथे शेतकऱ्यांची बनिम पेटवली तीन लाखांचे नुकसान
उदगीर:तालुक्यातील कुमदाळ येथे शेतकऱ्यांची सोयाबीनची बनिम पेटवून दिल्याची घटना घडली आहे,पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,उदगीर तालुक्यातील कुमदाळ येथील शेतकरी राजेंद्र चंदरराव पाटील यांनी त्यांच्या सर्वे नंबर 30/4 मधील सोयाबीन काढून शेतात बनिम लावली होती 25 नोव्हेंबर रोजी कोणीतरी अज्ञाताने फिर्यादीच्या शेतातील सोयाबीनच्या बनमीला आग लावून पेटवून दिले,यात अंदाचे 60 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाला असून 3 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी फिर्याद राजेंद्र चंदरराव पाटील यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुरंन 653/23 कलम 435 भादवी प्रमाणे 25 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस नाईक केंद्रे हे करीत आहेत.
0 Comments