Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

डोळ्यात मिरची पूड टाकून २६ तोळे सोन्याचे दागिने लुटीचा बनाव करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल.

डोळ्यात मिरची पूड टाकून २६ तोळे सोन्याचे दागिने लुटीचा बनाव करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल. 

 स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणची कारवाई..

लातूर:डोळ्यात मिरची पूड टाकून २६ तोळे सोन्याच्या लुटीचा बनाव करणाऱ्या सराफा व्यापाऱ्यांला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,२३ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास लातूर येथील सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके, वय ३१ वर्ष, राहणार पोचम्मा गल्ली ,लातूर यांनी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे २३ डिसेंबर  रोजी सायंकाळी तक्रार केली होती.सराफ लाईन लातूर येथील एका दुकानातून २० लाख ४६ हजार रुपये किमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने त्याचे स्कुटी गाडीच्या डिक्की मध्ये घेऊन नेहमीप्रमाणे गिर्‍हाईकांना दाखविण्यासाठी रेणापुर येथे गेलो होतो. तेथून परत येत असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रेणापुर ते लातूर जाणारे रोडवरील कातळे नगर,जवळ मोटर सायकल वरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने माझ्या डोळ्यात मिरची पूड टाकून माझ्या गाडीतील २६ तोळे सोन्याचे दागिने चोरून घेऊन पळून गेले आहेत.अशी तक्रार केली. सदर तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण बि.चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे अधिकारी अमलदारांचे पथके तयार करून मार्गदर्शन करून तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.सदर पथकांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तसेच तक्रारदार अमर अंबादास साळुंके याचे कडे कुशलतेने विचारपूस केली. घडलेली घटना व अमर साळुंके सांगत असलेल्या हकीकत मध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत होत्या. त्यावरून पथकाने अमर साळुंके यास विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की, मला लोकांचे पैसे देणे झाल्याने सदरचे दागिने चोरी गेल्याचा बनाव करून त्यामधून माझा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी चोरीचा बनाव केल्याचे कबूल केले. तसेच त्याने  रेणापूर ते लातूर कडे येणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये खड्डा करून लपवून ठेवलेले २० लाख ४६ हजार  रुपयांचे २६ तोळ्याचे दागिने काढून दिल्याने ते पोलिसांनी हस्तगत केले आहे.डोळ्यात मिरची पूड घालून सोन्याचे दागिने लुटीचा बनाव करून पोलिसांना खोटी तक्रार दिल्याच्या कारणावरून अमर अंबादास साळुंके,वय ३१ वर्ष, सोने चांदीचे व्यापारी राहणार पोचमा गल्ली, लातूर याचे विरुद्ध पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे ठाणे अंमलदार लक्ष्मण धर्माजी कुंभरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी अतिशय कुशलतेने सदर घटनेचा तपास करून सदरची घटना ही खोटी असून बनवाबनवी केल्याचे निष्पन्न करून तक्रारदारा कडूनच २० लाख ४६ हजार रुपयांचे २६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहे.सदरची कारवाई वरिष्ठांचे व उपविभागीय पोलीस अधिकारी,चाकूर चार्ज लातूर ग्रामीण बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांचे मार्गदर्शनात  सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड ,पोलीस अंमलदार मोहन सुरवसे, प्रदीप स्वामी,नितीन कठारे, मनोज खोसे, सचिन मुंडे, तसेच पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार ,पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस अंमलदार चौगुले, चंद्रपाटले, दरोडे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात