तेरू नदी पात्रातील गाळ उपसा रो. ह. यो. मधून करा..!- मारोती पांडे
जळकोट..(प्रतिनिधी ). लातूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकची मोठी नदी म्हणून तेरू नदी ही उदगीर जळकोट तालुक्यातून वाहते या नदी मध्ये अनेक ठिकाणी गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमाता कमी झाली आहे..
त्यामुळे रोजगार हमी योजनेतून तेरू नदी पात्रातील गाळ काढून खोलीकारण केल्यास नवीन होत असलेल्या सात बरेजेस मध्ये मोठया प्रमाणात पाणी साठवण होणार आहे व 18ते 20 की.मी. पाणी थांबण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी व जनतेला पिण्याच्या साठी पाणी मोठया प्रमानातं उपलब्ध होणार आहे.
हे काम मार्गी लागावे म्हणून राज्याचे मृद व जलसंधारण तथा रोजगार हमी योजना मंत्री ना. श्री संदीपान जीं भुमरे साहेब व माजी राजमंत्री आ. संजयजी बनसोडे साहेब . आणि महाराष्ट्र राज्याचे सहायक संचालक श्री विजय कलवले साहेब यांची मुंबई मध्ये भेट घेऊन जिल्हा बॅंकचे संचालक तथा काँग्रेस पक्षाचे जळकोट तालुका अध्यक्ष मारोती पांडे यांनी निवेदणाद्वारे मागणी केली आहे..
0 Comments